बालपण,समज आणि शिळी भाकरी
आमच्या 80 च्या दशकात जन्मलेल्या पिढीचे बालपण सर्वार्थाने भन्नाट आणि तितकेच भाबडे देखील होते.अनेक अतर्क्य गोष्टींवर आमचा लगेच विश्वास बसायचा.आमच्या घरातले वडीलधारे देखील आमचे चौखूर उधळणारे बालपण धाकात ठेवण्यासाठी अनेक स्टोऱ्या आम्हाला बेमालूम पणे चिकटवायचे. आणि आमचा देखील त्यावर विश्वास बसायचा,पण असे का हे विचारायची हिम्मत व्हायची नाही. आमच्या पिढी मध्ये कॉमन आणि तितकेच "लोकप्रिय"असलेले समज म्हणजे...फळाची बी गिळली तर पोटात झाड येते,एक साळुंकी दिसली तर दिवस वाईट जातो आणि दोन दिसल्या तर चांगला,कुठेही गाढव ओरडण्याचा आवाज ऐकला आणि स्वतःच्या डोक्याच्या केसांना हात लावला तर केस चांगले लांबसडक्क वाढतात.आणि सगळ्यात अतरंगी समज काय तर मेहंदी मध्ये चिमणी ची "शी"घातली की मेहंदी लालचुटुक रंगते...मग काय सणासुदीला मेहंदी लावण्याआधी आमचा मोर्चा गावातल्या वडाच्या पाराखाली जमायचा कारण तिथे असा "ऐवज" मुबलक असायचा.बाई कित्ती ते भाबडेपण. आणि या सगळ्यावर वरताण,आम्हाला चिकटवून गळी उतरवलेली गोष्ट म्हणजे....तू आमचा/आमची नाहीचेस,तुला शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतली आहे.पो